अंधेरी गॅस गळती दुर्घटना: जळते शरीर, उद्ध्वस्त स्वप्नं आणि मदतीसाठी हंबरडा!

kiran
मुंबईतील अंधेरी पूर्व येथे ९ मार्चच्या रात्री झालेल्या भीषण गॅस गळतीमुळे २२ वर्षीय अरविंद कैथल याच्या आयुष्याला काळोखाने ग्रासले आहे. या दुर्घटनेत ८०% भाजलेल्या त्याच्या मित्राचा मृत्यू झाला, तर अरविंद ५५% भाजलेल्या अवस्थेत जीवासाठी झुंज देत आहे. पण त्याच्या कुटुंबासमोर आता जखमांइतकीच मोठी समस्या उभी राहिली आहे – उचलू न शकणाऱ्या रुग्णालयाच्या बिलांची! आयुष्याचा संघर्ष आणि वाढते हॉस्पिटल बिल अरविंदला राष्ट्रीय बर्न्स... Read more on Kya News App
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बहुचर्चित गोखले पुलाच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा.

Vinayak Bhojane
मुंबई: अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पुलाचा दुसरा भाग १०० टक्के तयार झाला आहे. १ ते ५ मे दरम्यान हा पूल उघडण्याची योजना बीएमसीने आखली आहे. त्याच वेळी, Eastern Suburbs मधील विक्रोळी पुलाचे ९५% काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. मे २०२५ च्या अखेरीस या पुलाचे १००% काम पूर्ण होईल. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून बीएमसी हा पूल वाहतुकीसाठी खुला करू शकते.... Read more on Kya News App
मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार.

Vinayak Bhojane
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या मुंबईतील दुसऱ्या भुयारी मेट्रोचा दुसरा बोगद्याचे काम मेअखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे ही मेट्रो सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडणार आहे, अशी माहिती आता अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून मेट्रो ७ अ मार्गिकेची उभारणी सुरू असून, ३.४ किमी लांबीच्या या... Read more on Kya News App
उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?'; युतीच्या चर्चा सुरू असताना मनसे नेत्याचा भोंग्याच्या आंदोलनावरून सवाल.

Vinayak Bhojane
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राज-उद्धव युतीच्या चर्चा होताना दिसत आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येणार का याची उत्सुकता अनेकांना होती, अखेर दोन्ही भावांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. अशातच मनसे गटाचे नेते आणि मुंबई अध्यक्ष Sandeep Deshpande यांनी मनसेने केलेल्या भोंग्यांच्या आंदोलनाचा धागा पकडत उद्धव ठाकरेंना तिखट सवाल केला आहे. बात निकलेगी बहोत दुर तक जायेगी, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना १७ हजार केसेस... Read more on Kya News App
‘मुंबईची क्षमता आहे का?’, विचार न करताच विकासकामांना परवानगी, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका.

Vinayak Bhojane
मुंबई : ‘देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रचंड बांधकामे व विकासकामांमुळे पायाभूत सुविधा, पर्यावरण व सार्वजनिक सेवांवर ताण दिसून येत आहे. सहन होण्यापलीकडे आणि क्षमतेबाहेर विकासकामे झाल्यास पर्यावरणाचा तसेच शहरवासियांच्या जगण्याच्या दर्जाचा ऱ्हास होतो आणि पायाभूत सुविधाही कोलमडून पडतात. मुंबईबाबत सर्व अंगांनी सर्वेक्षण करून सर्वंकष अभ्यास होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे याविषयी राज्य सरकारला निर्देश... Read more on Kya News App
बनावट कागदपत्रांद्वारे ‘लाडक्या बहिणीं’च्या नावे कर्ज.

Vinayak Bhojane
मुंबई : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता पाहून, फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून मानखुर्दमधील ६५ महिलांच्या नावावर २० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जातेय. आरोपींमध्ये मानखुर्द परिसरातील एका महिलेसह चार ते पाच जणांचा समावेश असून, या प्रकरणात वित्त कंपनीतील दोन कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्य... Read more on Kya News App
रुग्णवाहिका निविदा प्रक्रियेतील त्रुटींची तज्ज्ञांमार्फत चौकशी करा; न्यायमित्राची उच्च न्यायालयाकडे शिफारस.

Vinayak Bhojane
मुंबई : महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (मेस्मा) उपक्रमाअंतर्गत १,७५६ रुग्णवाहिका पुरवण्याशी संबंधित निविदा प्रक्रियेतील तांत्रिक अनियमितता आणि त्रुटींची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची स्वतंत्र समिती नेमण्यात यावी, अशी शिफारस न्यायमित्राने (अमायकस क्युरी) उच्च न्यायालयाला नुकतीच केली. विकास लवांडे यांनी या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी या प्रकरणी न्यायमित्र म्हणून नियुक्त करण्यात आलेले वरिष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांनी उपरोक्त शिफारस केली. रुग्णवाहिकांचा पुरवठा... Read more on Kya News App